योग्य नियोजन, कठोर मेहनतीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी होऊ शकतो - स्वाती मोहन राठोड

 


UPSC मधून आयएएस उत्तीर्ण स्वाती राठोड यांचा संगमेश्वरमध्ये  सत्कार

सोलापूर प्रतिनिधि 

'' प्रशिक्षणाशिवाय UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जसे की UPSC परीक्षेचा नमुना, UPSC परीक्षा अभ्यासक्रम, UPSC मार्किंग योजना, UPSC परीक्षेसाठी पर्यायी पेपर कसे निवडायचे इ. सर्वोत्तम पद्धतीने. UPSC 3 टप्प्यांमध्ये परीक्षा घेते म्हणजे प्रिलिम, मुख्य आणि मुलाखती. प्रिलिम आणि मुख्य दोन्हीकडे जाण्याच्या धोरणासाठी केंद्रित अभ्यास आवश्यक आहे. UPSC प्रिलिम्स आणि मेन हे दोन एकमेकांपेक्षा खूप वेगळे नाहीत, हे फक्त अध्यायांचे एक मोठे ओव्हरलॅप आहे. उमेदवारांनी UPSC प्रिलिम आणि मुख्य दोन्हीसाठी एकत्रित तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. योग्य नियोजन, कठोर मेहनतीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी होऊ शकतो ''  असे प्रतिपादन आयएएस उत्तीर्ण स्वाती मोहन राठोड  यांनी केले.  त्या संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या  त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होत्या.  व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसार कुंटे   कला शाखा समन्वयक शिवशरण दुलंगे, राठोड आणि चव्हाण कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.  


                                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि या कार्यक्रमाचा हेतू रंगसिद्ध पाटील यांनी स्पष्ट केला .  त्यानंतर आयएएस कु.स्वाती मोहन राठोड यांचा  कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य प्रसाद कुंटे आपले मनोगत व्यक्त करताना  म्हणाले ,'' स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी  कला शाखेतील विषय देखील  अत्यंत महत्त्वाचे आहेत  शालेय जीवनात आपण गणित विज्ञान आणि  इंग्रजी शिकतोच त्याचा फायदा आणि त्यातले सातत्य हे महत्त्वाचे आहे याच कार्यक्रमात आपण  आपली एनसीसी ची विद्यार्थिनी  त्वरिता कटके  हिचे कौतुक करत आहोत.  तिचे खेळातील यश नक्कीच  कॉलेजचे नाव उज्वल करेल.'' 


स्वाती चव्हाण पुढे म्हणाल्या की,  ''UPSC चा भूगोल अभ्यासक्रम हा प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेचा एक भाग आहे आणि तो पर्यायी विषय म्हणूनही उपलब्ध आहे. UPSC भूगोल पर्यायी अभ्यासक्रमामध्ये पृथ्वी आणि तेथील रहिवाशांच्या भौतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पैलूंचा व्यापक अभ्यास समाविष्ट आहे. UPSC भूगोल अभ्यासक्रमामध्ये भूरूपशास्त्र, समुद्रशास्त्र, हवामानशास्त्र, जैव भूगोल, पर्यावरणीय पर्यावरणशास्त्र आणि प्रादेशिक नियोजन यांसारख्या विषयांचा समावेश आहे. त्यात भारताचा भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय भूगोल, तसेच इतर देशांच्या भूगोलाचाही समावेश आहे. UPSC अभ्यासक्रमाची रचना पृथ्वी आणि तेथील रहिवाशांची समग्र माहिती देण्यासाठी आणि उमेदवारांमध्ये विश्लेषणात्मक आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी केली गेली आहे. '' 

 व्याख्यानानंतर  बीए सिविल सर्विसेसच्या विद्यार्थ्यांसोबत  स्वाती राठोड यांनी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.  याच कार्यक्रमात  त्वरिता खटके हिचा सन्मान करण्यात आला. एनसीसी विभागाच्या वतीने झालेल्या एयर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या 9 महाराष्ट्र एनसीसी बटालियनची कॅडेट सार्जंट त्वरिता खटके ही सहभागी झाली होती.पुढे इंदोर ,मध्य प्रदेश येथे होणाऱ्या जी.वी. माळवणकर नॅशनल एयर रायफल स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज देसाई यांनी केले तर आभार  प्रकाश कतनाळी याने मानले.







  या कार्यक्रमाची  युट्युब लिंक 01  https://youtu.be/0Lzvpq209JI?feature=shared 
02 https://youtu.be/kkZYzRqmHv8?feature=shared
  

 संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी  यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी  आवश्यक कोणकोणत्या बाबी आहेत यासाठी  अनअकॅडमीची खालील वेबसाईट लिंक देत आहोत https://unacademy.com/content/upsc/exam     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे