पोस्ट्स

जुलै ६, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजमध्ये कवी कुलगुरू कालिदास दिन साजरा

इमेज
कालिदासो जने जने, कंठे कंठे संस्कृतम्   सोलापूर ( दिनांक ६ जुलै ) आज ‘महाकवी कालिदास दिन.’ कालिदासाचा जन्मदिन, जन्मतारीख उपलब्ध नाही  पण मेघदूतातल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे कालिदास या तिथीशी एवढा जोडला गेला की, ‘आषाढ प्रतिपदा’ हा दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील कालिदास हा असा एकमेव साहित्यकार आहे की, ज्याच्या काव्यातील एका उल्लेखामुळे तो दिवस त्याच्या नावाने ओळखला जातो. केवळ संस्कृत वाङ्मयातच नव्हे, तर संपूर्ण जागतिक वाङ्मयांत कविकुलगुरू कालिदासाचे स्थान अद्वितीय आहे. भारतीय परंपरा आणि पाश्चात्त्य अभ्यासक या दोघांनीही सर्वश्रेष्ठ संस्कृत कवी म्हणून कालिदासाचा गौरव केला. त्याचा काळ कोणताही असो, त्याने काळमार्गावर उमटवलेली मुद्रा इतकी ठळक आहे की, दीड हजार वर्षे उलटून गेली तरी त्याचे स्थान अढळ आहे. तत्तुल्यकवेराभावात - अजूनही त्या तोडीच्या दुसर्‍या कवीचे नाव आढळले नाही, म्हणून ‘अनामिका सार्थवती बभूव’ अनामिका हे बोटाचे नाव सार्थ झाले. म्हणूनच, या श्लोकात कालिदासाची सर्व महती आहे, असे मला वाटते.  असे प्रतिपादन प्रदीप आर्य यांनी केले. असे प्रतिप