पोस्ट्स

ऑक्टोबर १०, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

' टीबी हरेगा देश जीतेगा ' हा संदेश लक्षात घ्या - डॉ.प्रियांका भराडे

इमेज
                              सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम सोलापूर प्रतिनिधी --- आरोग्य हेच खरे धन आहे. निरोगी नागरिक हेच कोणत्याही देशाचे खरे बळ असते. पण आजही अनेक आजार आपल्या समाजात पसरलेले आहेत, त्यांपैकी एक गंभीर आणि संसर्गजन्य आजार म्हणजे क्षयरोग (टीबी) होय. या आजाराचा नायनाट करण्यासाठी भारत सरकारने  ' टीबी हरेगा देश जीतेगा ' हा महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.प्रियांका भराडे यांनी मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाल्या '' क्षयरोग म्हणजे काय? क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीरातील इतर अवयवांनाही बाधित करू शकतो. सतत खोकला येणे, ताप, वजन कमी होणे, अशक्तपणा ही याची प्...

अ‍ॅनिमिया जनजागृती शिबिर आणि 'आरोग्य व पोषण' विषयक व्याख्यान

इमेज
  सोलापूर, दि.  ४ ऑक्टोबर २०२५  फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेच्यावतीने संगमेश्वर महाविद्यालयात रक्तातील हीमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फर्तपणे सहभाग नोंदविला आणि लाभ घेतला. विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच पोषणाच्या सवयी सुधाराव्यात, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाची सुरुवात सोलापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ  डॉ. समन तांबोळी यांच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी ‘आरोग्य आणि पोषण’ या विषयावर सखोल माहिती दिली. आहारातील मूलभूत घटक, अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, तसेच तणावमुक्त जीवनशैली यावर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.तसेच १४७ विद्यार्थ्यांची एच.बी. चाचणी करण्यात आली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे कार्यक्रम समन्वयक  विरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमचे  मोलाचे योगदान लाभले. या उपक्रमाला संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.ज्योती काडादी आणि महाविद्यालय...

संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे हिंदी पखवाड़ा निमित्त झालेल्या पुरस्कारवितरण समारंभ

इमेज
सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय यांच्याशी केलेल्या करारानुसार (MOU), संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे आयोजित हिंदी पखवाड़ा निमित्त  झालेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कारवितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवराव मुंडे उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षपद उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, हिंदी विभागप्रमुख डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी प्रस्तावना मांडून मुख्य पाहुण्यांचे स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी मुख्य पाहुणे डॉ. देवराव मुंडे यांचा यथोचित सन्मान केला. या समारंभाला डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. महानंदा बागले, डॉ. दादासाहेब खांडेकर हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. देवराव मुंडे यांनी सांगितले की, हिंदी आता संपूर्ण जगाची भाषा बनली आहे. हिंदी केवळ बोलचालीतच नव्हे तर व्यवहाराचीही भाषा बनली आहे. हिंदीमध्ये रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. १४ सप्टेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटनेत घटना...