पोस्ट्स

फेब्रुवारी ७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेईई मेनमध्ये संगमेश्वर कॉलेजचे देवांग देशपांडे, प्रवीण याबाजी अव्वल

इमेज
  जेईई मेनमध्ये संगमेश्वर कॉलेजचे देवांग देशपांडे ,  प्रवीण याबाजी अव्वल सोलापूर ( दिनांक ७ ) नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA) ने JEE मुख्य सत्र एकचा निकाल जाहीर केला आहे. जेईई मेनमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या देवांग नितीन देशपांडे  (९६ .७०)  प्रवीण अनिल याबाजी   (९४.५६ ) पर्सेन्टाइल गुण मिळवून कॉलेजमधून अव्वल ठरले. सोमवारी रात्री उशिरा JEE  चा  निकाल जाहीर झाला. jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in या दोन अधिकृत वेबसाइटवर JEE मुख्य निकालाच्या लिंक देण्यातआल्या होत्या . ही परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. NTA ने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार , जानेवारीच्या सत्र परीक्षेसाठी ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.              यशस्वी विद्यार्थ्यांचा संगमेश्वर कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी , प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई , उपप्राचार्य प्रसाद कुंटे , एसआयपी समन्वयक डॉ. गणेश मुडेगावकर , संतोष पवार   यांनी अभिनंदन  करून पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे--- संगमेश्वर कॉलेजमध्ये आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

इमेज
मंगळवार, ७ फेब्रुवारी २०२३ संचार प्रतिनिधी • सोलापूर, दि. ६  विद्याथ्र्यांनी इंटरनेटचा वापर चांगल्या कामासाठी करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. इंग्रजीबरोबरच संगणक साक्षर व्हावे, परंतु अहंकाराचा वारा लागू देऊ नये, असा मौलिक सल्ला कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी दिला. सोमवारी, संगमेश्वर महाविद्यालयात महाराष्ट्र  व्हिजन फोरम या युवाकेंद्रित 'समृध्द महाराष्ट्राचा आवाज व्हा' या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण, आरोग्य, औद्योगिक विकास, शेती, पर्यावरण, क्रीडा, मानसिक स्वास्थ्य, साखर कारखाना आदी विविध प्रश्नांबद्दल विद्यार्थ्यांची मते जाणून घेत त्यांना मनमोकळी उत्तरे देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी त्यांनी सोलापूरची ओळख काय ? या प्रश्नाने संवाद साधण्यास माहिती सांगताना त्यांनी कुठलाही संकोच न करता आपण नववीपर्यंत शिक्षणात कसे कच्चे होतो आणि नंतर मात्र स्वतःहून कशी प्रगती साधली. सुरुवात करून युवकांना बोलते केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना हेरून त्याची योग्य उत्