पोस्ट्स

युवा महोत्सवात उपविजेत्या कलाकारांचा कौतुक सोहळा

इमेज
सोलापूर प्रतिनिधी -  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २१ व्या युवा महोत्सवात उपविजेत्या ठरलेल्या संगमेश्वर कॉलेजच्या कलाकारांचा कॉलेजच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी विजेत्या सर्व संघाचे कौतुक केले आणि त्यांच्या कारकिर्दीस  शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना सचिव ज्योती  काडादी यांनी कलाकारांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले. भविष्यातही असेच अथक परिश्रम करून आपण आपला संघ पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. संगमेश्वर कॉलेजची  क्रीडा क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक परंपराही खूप मोठी आहे. तो वारसा जपण्याचे  कर्तव्य कलाकारांनी निभावले आहे.असा मनोदय व्यक्त केला. कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात प्रारंभी प्राचार्य ऋतुराज बुवा  यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.दादासाहेब खांडेकर यांनी सविस्तर वृत्तांत सांगितला. त्यानंतर कलाकारांचा सत्कार झाला. सत्कार नंतर गोल्डन गर्ल पुरस्कार विजेती सई दरेकर आणि गतवर्षीच्या गोल्डन बॉय पुरस्कार विजेता जैद शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या....

हिंदी विभागातर्फे आयोजित एकदिवसीय कार्यशाला -अनुसंधान प्रविधि आणि प्रक्रिया

इमेज
  संगमेश्वर महाविद्यालय, सोलापुर स्वायत्त हिंदी विभागातर्फे आयोजित एकदिवसीय कार्यशाला "अनुसंधान प्रविधि आणि प्रक्रिया" या विषयावर 15 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडली. यावेळी मुख्य पाहुणे व विषय प्रवक्ते डॉ. राजकुमार वडजे यांच्या करकमलांद्वारे दीपप्रज्वलन करण्यात आले. संगमेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांच्या हस्ते वडजे यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी प्रस्तावना मांडली तर सबा शेख यांनी मुख्य पाहुण्याची ओळख करून दिली. "अनुसंधान प्रविधि" या विषयावर बोलताना डॉ. राजकुमार वडजे यांनी सांगितले की, "विविध विषयांवर अनुसंधान होणे अत्यावश्यक आहे. अनुसंधानाला मागणीच नाही तर शोधाची गरज आहे. नवीन शोधामुळेच अनुसंधानाला नवीन दिशा मिळते आणि या शोधात अनुसंधानकर्त्याने पूर्ण प्रयत्न करून जे लपलेले आहे ते बाहेर काढण्याचे काम अनुसंधानाद्वारे करणे आवश्यक आहे. अनुसंधानाच्या विविध शैली आहेत, जसे की पत्रलेखन शैली, प्रश्नोत्तर शैली, मुलाखत शैली, ललित गद्य शैली, भाषाविज्ञान शैली, साहित्यिक शैली. या विविध शैलींद्वारे अनुसंधानाला अंतिम रूप दिले जाऊ शकत...

डॉ.ए.पी.जे.कलाम जन्मदिन - वाचन प्रेरणा दिन उत्साहात

इमेज
पुस्तकांमुळे मनुष्य जीवन घडते  - प्रा.डॉ.श्रीकांत येळेगावकर सोलापूर दिनांक १५   ''मनुष्याचे जीवन हे सतत शिकण्याच्या प्रवृत्तीने विकसित होत असते. या जीवन प्रवासात पुस्तकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पुस्तक हे केवळ ज्ञानाचे भांडार नाही, तर ते विचारांना दिशा देणारे, मनाला प्रेरणा देणारे आणि आयुष्य घडवणारी साधने आहेत.पुस्तकांमुळे मनुष्याचे जीवन घडते.''  असे प्रतिपादन हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेजमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी आयोजित 'वाचन प्रेरणा दिना'च्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी, ग्रंथपाल डॉ. विजय मुलीमनी  सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी उपस्थित होते.                                  प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.विजय मुलीमनी यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी वाच...

' टीबी हरेगा देश जीतेगा ' हा संदेश लक्षात घ्या - डॉ.प्रियांका भराडे

इमेज
                              सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम सोलापूर प्रतिनिधी --- आरोग्य हेच खरे धन आहे. निरोगी नागरिक हेच कोणत्याही देशाचे खरे बळ असते. पण आजही अनेक आजार आपल्या समाजात पसरलेले आहेत, त्यांपैकी एक गंभीर आणि संसर्गजन्य आजार म्हणजे क्षयरोग (टीबी) होय. या आजाराचा नायनाट करण्यासाठी भारत सरकारने  ' टीबी हरेगा देश जीतेगा ' हा महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.प्रियांका भराडे यांनी मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाल्या '' क्षयरोग म्हणजे काय? क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीरातील इतर अवयवांनाही बाधित करू शकतो. सतत खोकला येणे, ताप, वजन कमी होणे, अशक्तपणा ही याची प्...

अ‍ॅनिमिया जनजागृती शिबिर आणि 'आरोग्य व पोषण' विषयक व्याख्यान

इमेज
  सोलापूर, दि.  ४ ऑक्टोबर २०२५  फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेच्यावतीने संगमेश्वर महाविद्यालयात रक्तातील हीमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फर्तपणे सहभाग नोंदविला आणि लाभ घेतला. विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच पोषणाच्या सवयी सुधाराव्यात, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाची सुरुवात सोलापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ  डॉ. समन तांबोळी यांच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी ‘आरोग्य आणि पोषण’ या विषयावर सखोल माहिती दिली. आहारातील मूलभूत घटक, अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, तसेच तणावमुक्त जीवनशैली यावर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.तसेच १४७ विद्यार्थ्यांची एच.बी. चाचणी करण्यात आली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे कार्यक्रम समन्वयक  विरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमचे  मोलाचे योगदान लाभले. या उपक्रमाला संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.ज्योती काडादी आणि महाविद्यालय...

संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे हिंदी पखवाड़ा निमित्त झालेल्या पुरस्कारवितरण समारंभ

इमेज
सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय यांच्याशी केलेल्या करारानुसार (MOU), संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे आयोजित हिंदी पखवाड़ा निमित्त  झालेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कारवितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवराव मुंडे उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षपद उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, हिंदी विभागप्रमुख डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी प्रस्तावना मांडून मुख्य पाहुण्यांचे स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी मुख्य पाहुणे डॉ. देवराव मुंडे यांचा यथोचित सन्मान केला. या समारंभाला डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. महानंदा बागले, डॉ. दादासाहेब खांडेकर हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. देवराव मुंडे यांनी सांगितले की, हिंदी आता संपूर्ण जगाची भाषा बनली आहे. हिंदी केवळ बोलचालीतच नव्हे तर व्यवहाराचीही भाषा बनली आहे. हिंदीमध्ये रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. १४ सप्टेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटनेत घटना...

स्पर्धा परीक्षेत नियोजबद्ध अभ्यासातील सातत्य महत्वाचे - मयुरेश वाघमारे

इमेज
आयइएसमध्ये देशात आठवा आल्याबद्दल संगमेश्वरमध्ये सत्कार सोलापूर दिनांक ४ -  ''आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. शासकीय सेवा असो वा खाजगी क्षेत्रातील उच्च पदे — प्रत्येक ठिकाणी ज्ञान, कौशल्य आणि संयमाची कसोटी लागते. अशा स्पर्धात्मक वातावरणात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसते; त्यासोबत नियोजबद्ध अभ्यासातील सातत्य महत्वाचे आहे.'' असा सल्ला आयएएस श्रेणीतील भारतीय आर्थिक सेवेत महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेल्या मयुरेश वाघमारे यांनी दिला.ते आयइएसमध्ये देशात आठवा,  महाराष्ट्रातून पहिला आल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी,  प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.         ते  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले  '' सातत्य म्हणजे एखाद्या उद्दिष्टासाठी नियमित आणि ठरावीक वेळ देत राहणे. अभ्यासातील सातत्य म्हणजे रोजच्या दिनचर्येत अभ्यासाला ठराविक स्थान देणे, अभ्यासाच्या वेळेत विचलित न होणे आणि परिस्थिती ...