पोस्ट्स

स्पर्धा परीक्षेत नियोजबद्ध अभ्यासातील सातत्य महत्वाचे - मयुरेश वाघमारे

इमेज
आयइएसमध्ये देशात आठवा आल्याबद्दल संगमेश्वरमध्ये सत्कार सोलापूर दिनांक ४ -  ''आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. शासकीय सेवा असो वा खाजगी क्षेत्रातील उच्च पदे — प्रत्येक ठिकाणी ज्ञान, कौशल्य आणि संयमाची कसोटी लागते. अशा स्पर्धात्मक वातावरणात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसते; त्यासोबत नियोजबद्ध अभ्यासातील सातत्य महत्वाचे आहे.'' असा सल्ला आयएएस श्रेणीतील भारतीय आर्थिक सेवेत महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेल्या मयुरेश वाघमारे यांनी दिला.ते आयइएसमध्ये देशात आठवा,  महाराष्ट्रातून पहिला आल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी,  प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.         ते  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले  '' सातत्य म्हणजे एखाद्या उद्दिष्टासाठी नियमित आणि ठरावीक वेळ देत राहणे. अभ्यासातील सातत्य म्हणजे रोजच्या दिनचर्येत अभ्यासाला ठराविक स्थान देणे, अभ्यासाच्या वेळेत विचलित न होणे आणि परिस्थिती ...

‘हिंदी दिवस’ निबंध स्पर्धेत आयेशा नासिर सय्यद प्रथम

इमेज
सोलापूर-  दिनांक १४ प्रतिनिधी भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध असा देश आहे. येथे प्रत्येक राज्याची आपली एक स्वतंत्र भाषा आहे. तथापि, राष्ट्राला एकत्र आणणारी आणि संवादाची सुलभ साधने निर्माण करणारी भाषा म्हणून हिंदीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. या भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी दिवसानिमित्त  संगमेश्वर कॉलेज हिंदी कनिष्ठ विभाग आयोजित निबंध स्पर्धेमध्ये  आयेशा नासिर सय्यद हिने प्रथम यरण्याचा मन मिळवला. पुढील निकाल याप्रमाणे ---  सायली दीपक शिरसाठ -द्वितीय, प्रज्ञा दिनकर वाघमारे- तृतीय ,मनोरमा सुरज कांबळे - उत्तेजनार्थ, किरण इस्माईल नदाफ- उत्तेजनार्थ, सादिया हाजीमलंग शेख - उत्तेजनार्थ.परीक्षक म्हणून हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.संघप्रकाश दुड्डे यांनी सहकार्य केले.                                              स्पर्धा सुरु होण्यापूर्वी प्रा. शिवराज पाटील यांनी हिंदी भाषेचे महत्त्...

संगमेश्वरचा माजी विद्यार्थी मयुरेश वाघमारे आयइएस परीक्षेत देशात आठवा

इमेज
 आयएएस श्रेणीतील भारतीय आर्थिक सेवेत महाराष्ट्रातून एकमेव निवड सोलापूर : युपीएससीच्या आयइएस भारतीय आर्थिक सेवा म्हणजेच इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटकाविला आहे. एकूण १२ जागांसाठी देशभरातील ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ही परीक्षा आयएएस श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे यांची एकमेव निवड झाली आहे. मूळचे सोलापूरचे तसेच सध्या अलिबाग येथे कार्यरत असलेल्या अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत. युपीएससीकडून जून २०२५ मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा लेखी निकाल ९ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली. अखेर मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयात तसेच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते. मयुरेश वाघमारे यांनी इंग्लंड येथून ॲग्रीकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनाॅमिक्स या विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे...

प्रामाणिक जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर IIM चे स्वप्न नक्कीच पूर्ण होते. ---ईशान मेरू

इमेज
भारतीय व्यवस्थापन संस्था इथे निवडीबद्दल संगमेश्वर कॉलेजमध्ये सत्कार  सोलापूर प्रतिनिधी -- ''भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM या भारतातील नामांकित आणि उच्च दर्जाच्या संस्थामध्ये निवड होण्यासाठी प्रामाणिक जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर IIM चे स्वप्न नक्कीच पूर्ण होते''. असे प्रतिपादन संगमेश्वर कॉलेजचा माजी विद्यार्थी क्रीडापटू ईशान वैभव मेरू यांनी केले. भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM  मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा कॉलेजच्या वतीने सत्कार संस्थेच्या सचिव प्रा. ज्योती काडादी करण्यात आला. त्याप्रसंगी तो बोलत होता. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्रचार्य प्रसाद कुंटे पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे, वैभव मेरू, डॉ.राजश्री मेरू आदी उपस्थित होते.  त्याप्रसंगी बोलताना उप्राचार्य प्रसाद कुंटे म्हणाले की '' भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM या भारतातील नामांकित आणि उच्च दर्जाच्या संस्था आहेत. व्यवस्थापनशास्त्र शिकण्यासाठी आणि मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर काम करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की, त्यांनी IIM मध्ये प्रवेश मिळवावा. मात्र या स्वप्नासाठी प्रच...

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी

इमेज
संगमेश्वरध्ये हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आणि प्रबोधनपर व्याख्यान   सोलापूर दिनांक २४ -   हिमोग्लोबिन तपासणी हे मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल असल्याने विद्यार्थ्यांनी ही तपासणी वेळीच करून घ्यावी आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे या उद्देशाने संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रबोधनपर व्याख्यानात तज्ञांनी मार्गदर्शन केले.           महाविद्यालयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी का गरजेची याविषयी डॉ.वीणा माने स्त्रीरोगतज्ञ म्हणाल्या की "हिमोग्लोबिन ही शरीरातील ऑक्सिजन वाहून नेणारी महत्त्वाची प्रथिनीय घटक आहे. मुलींमध्ये मासिक पाळीमुळे रक्तस्राव होतो, तसेच चुकीच्या आहाराच्या सवयी, जंक फूडचे वाढते प्रमाण आणि पोषणातील असमतोल यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. या अवस्थेला ॲनिमिया   म्हणतात. ॲनिमियामुळे थकवा, अभ्यासात लक्ष न लागणे, एकाग्रतेत अडथळे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे व दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवतात." डॉ. प्रियांका भराडे व...

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

इमेज
विवेक पाणीभातेचा कॉलेज व ९ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने सत्कार  सोलापूर प्रतिनिधी – दिनांक २४ सप्टेंबर – ९महाराष्ट्र बटालियन एनसीसी संलग्नित असलेले संगमेश्वर कॉलेजचा एनसीसी कॅडेट विवेक पाणीभातेची नवी दिल्ली येथे राष्ट्रीय थल सेना कॅम्प नवी दिल्ली येथे निवड झाली होती. महाराष्ट्रातून जवळपास १० एनसीसी कॅम्प मधून अतिशय खडतर प्रक्रियेतून एनसीसी कॅडेटची निवड होत असते. विवेक हा २० मे  ते १५ सप्टेंबर पर्यंत जवळपास चार महिने तो एनसीसीच्या कॅम्पमध्ये सहभागी होता. नवी दिल्ली येथे झालेल्या थलसेना कॅम्पमध्ये महाराष्ट्राकडून १० एनसीसी कॅडेटची फायरिंग या प्रकारामध्ये निवड करण्यात आली होती त्यामध्ये विवेक पाणीभातेची निवड झाली होती. त्यामध्ये विवेक पाणीभाते याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. भारतामधील एकूण १७ एनसीसी संचालनालयापैकी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक मिळवला. यामध्ये विवेक पाणीभातेचे मोलाचे योगदान होते.राष्ट्रीय थल सेना कॅम्प, नवी दिल्ली या कॅम्पमध्ये निवड होणे ही एनसीसी मधील अतिशय गौरवाची व अभिमानाची बाब आहे.             त्याच्या य...

कर्मयोगी अप्पासाहेबांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त अमृतदानातून विद्यार्थ्यांनी संकलित केले धान्य

इमेज
संगणक शास्त्र विभागाचा सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक १७ कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगणक शास्त्र विभाग यांच्या वतीने अमृत दान या उपक्रमांतर्गत एक मूठ धान्य समाजासाठी या हेतूने उस्फुर्त  धान्य जमा करण्याचे आवाहन शिक्षक, विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना केले होते. त्यानुसार एक मूठ धान्य समाजासाठी या हाकेला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी जवळपास ३००० जणांचे जेवण होईल इतके धान्य जमा केले.                             अमृतदान उपक्रमांतर्गत जमा झालेले धान्य श्री सिद्धेश्वर बोर्डिंग, विवेकानंद केंद्र संचलित अतिवृष्टीग्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या अन्नदान वाटप केंद्रास,  श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित अन्नछत्र मंडळास तसेच रॉबिनहूड आर्मी या फूड बँकेस वितरित करण्यात आले. संगणक शास्त्र विभागाच्या वतीने कर्मयोगी अप्पांसाहेबांच्या जयंतीदिनी हा उपक्रम हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना वर्गात सांगण्यात आला. ते आवाहन असे की, ''अतिवृष्टी झालेल्या भागात अनेक बांधवांना मोठ्या सं...