पोस्ट्स

कर्मयोगी अप्पासाहेबांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त अमृतदानातून विद्यार्थ्यांनी संकलित केले धान्य

इमेज
संगणक शास्त्र विभागाचा सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक १७ कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगणक शास्त्र विभाग यांच्या वतीने अमृत दान या उपक्रमांतर्गत एक मूठ धान्य समाजासाठी या हेतूने उस्फुर्त  धान्य जमा करण्याचे आवाहन शिक्षक, विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना केले होते. त्यानुसार एक मूठ धान्य समाजासाठी या हाकेला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी जवळपास ३००० जणांचे जेवण होईल इतके धान्य जमा केले.                             अमृतदान उपक्रमांतर्गत जमा झालेले धान्य श्री सिद्धेश्वर बोर्डिंग, विवेकानंद केंद्र संचलित अतिवृष्टीग्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या अन्नदान वाटप केंद्रास,  श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित अन्नछत्र मंडळास तसेच रॉबिनहूड आर्मी या फूड बँकेस वितरित करण्यात आले. संगणक शास्त्र विभागाच्या वतीने कर्मयोगी अप्पांसाहेबांच्या जयंतीदिनी हा उपक्रम हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना वर्गात सांगण्यात आला. ते आवाहन असे की, ''अतिवृष्टी झालेल्या भागात अनेक बांधवांना मोठ्या सं...

कर्मयोगीअप्पासाहेब काडादी जयंती I राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सातारचा माने प्रथम

इमेज
  सोलापूर (दिनांक १५) दैनिक संचार प्रबोधन मंच,संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त )आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितकर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११६ व्या जयंती प्रीत्यर्थ महाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा काल संपन्न झाली. राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, उनाड पाऊस, शिक्षण याचे नाव,अध्यात्म,धर्म,अर्थव्यवस्था,कला,साहित्य,संगीत यासह समाजातील सर्वच स्तरावरील आपले विषय  वैविध्यपूर्ण पद्धतीने मांडले. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धेश्वर प्रशालेचे प्राचार्य संतोष पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे संतोष पाटील यावेळी बोलताना म्हणाले की,''  अप्पासाहेबांचे व्यक्तिमत्व अत्यंत दूरदृष्टीचे बहुआयामी होते. सहकार, शिक्षण, राजकारण आणि समाजकारण  करत असताना  निष्पृह वृत्तीने त्यांनी  काम केले. काळाची पावले ओळखून कर्मयोगी अप्पासाहेबांनी सर्व घटकांना शिक्षण मिळावे ही बाब ओळखली...

रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा अभ्यास काळाची गरज – श्री. दिपक कक्कर

इमेज
संगमेश्वर कॉलेजमध्ये 'हॅंड्स ऑन रोबोटिक्स' विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न सोलापूर : ११ सप्टेंबर २०२५ आधुनिक काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होत आहे. त्यामध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे ठरतेय. उद्योग, आरोग्य, शेती याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याचा अंतर्भाव नवीन अभ्यासक्रमात करून विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. असे विचार प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ, उद्योगपती व झुआरी सिमेंट, सोलापूरचे प्लांट प्रमुख श्री. दिपक कक्कर यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक व भौतिकशास्त्र विभाग तसेच सुव्ही इन्स्ट्रुमेंट सोलापूर यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित एकदिवसीय राष्टीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील स्कूल ऑफ फिजिकल सायन्स विभागाचे संचालक डॉ. व्ही.बी.पाटील होते. श्री. कक्कर यांनी आपल्या भाषणात रोबोटिक्स तंत्रज्ञानावर विविधांगी विचार मांडले.  विशेषत: त्यांनी विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला दिला. आज अश...