पोस्ट्स

शालेय,महाविद्यालयीन अभिवाचन व सुलेखन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
 भाषा केवळ संवादाचे साधन नसून मानवी अभिव्यक्तीचे साधन आहे.                                                                         ममता बोल्ली    सोलापूर दिनांक २३  '' भाषा ही माणसाच्या विचारांना, भावना, अनुभव, कल्पना व ज्ञानाला व्यक्त करण्याचे प्रभावी साधन आहे. मनात निर्माण होणारे विचार केवळ अंतर्मनात राहिले तर त्यांचा समाजाला उपयोग होत नाही; परंतु भाषेच्या माध्यमातून ते शब्दरूपात येतात आणि संवाद शक्य होतो. बोलणे, लिहिणे, वाचन व श्रवण या सर्व क्रिया भाषेमुळेच घडतात. भाषेमुळे व्यक्ती आपल्या आनंद-दुःखाची, प्रेम-रागाची, आशा-निराशेची अभिव्यक्ती करू शकते. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, विज्ञान, प्रशासन—या सर्व क्षेत्रांत भाषा ही केंद्रस्थानी आहे. समाजातील परंपरा, इतिहास व संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही भाषा करते.म्हणूनच भाषा केवळ संवादाचे साधन नसून मानवी अभिव्यक्तीचे, विचारांच्...

शालेय विद्यार्थ्यांचा सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
सोलापूर दि .२३  सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षेचे असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांसाठी रेल्वे बोर्ड, सरळ सेवा भरती, राज्यसेवा, पोलीस भरती, संघ लोकसेवा आयोगाच्या  स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होताना कला शाखेतील अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेता यावे. या हेतूने इयत्ता नववी दहावीसाठी माध्यमिक गटातून, इयत्ता अकरावी बारावीसाठी उच्च माध्यमिक गटातून सामान्य ज्ञान स्पर्धा  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने घेण्यात आली  .ही स्पर्धा २३ डिसेंबरला दुपारी २ वाजता संपन्न झाली. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ १०० प्रश्न, १०० गुण,९० मिनिटे वेळ असे यामध्ये नियोजन आहे. कला, क्रीडा साहित्य, संस्कृती, विज्ञान तंत्रज्ञान, वाणिज्य आर्थिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा  या स्पर्धा परीक्षेत समावेश होता. सोलापूर शहर आणि परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी कला शाखेतील समन्वयक शिवशरण दुलंगे यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

बिझनेस क्विझमध्ये अपूर्वा आणि संस्कृती विजेते

इमेज
 उद्योग विश्वात अनुभवाचे शिक्षण महत्त्वाचे ठरते.                                        वासुदेव बंग  सोलापूर दिनांक २२  ''स्वतःला प्रश्न विचारा. असे म्हंटले जाते बारा वर्षापर्यंतच्या मुलांचा मेंदूचा विकास प्रश्न विचारण्यातून होतो. तरुणांनी उद्योजकाच्या दृष्टिकोनातून पुढे कसे जावे यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिकत गेले पाहिजे. अनुभव हाच सर्वात मोठा गुरु असतो. कुठल्याही उद्योगाला डिग्रीची आवश्यकता नाही, फक्त त्या दृष्टिकोनातून विचार आणि कष्ट घेण्याची तयारी असावी. चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा अनुभवाचे शिक्षण महत्त्वाचे.''असे प्रतिपादन उद्योजक वासुदेव बंग डेटा प्रा.लि.यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज कॉमर्स विभाग आयोजित बिजनेस क्विझच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य शरण काडादी, प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक प्रा.डॉ.मल्लिनाथ साखरे वाणिज्य विभागप्रमुख बाबास...

संगमेश्वर कॉलेज विभागीय बेसबॉल स्पर्धेत उपविजयी

इमेज
         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पुणे क्रीडा कार्यालय आयोजित बारामती येथे झालेल्या शालेय विभागीय बेसबॉल स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेच्या संघाने उपविजेतेपद  प्राप्त केले          या संघामध्ये  महेश तेली कर्णधार ,विरेश कुंभार ,धीरज रायकोटी ,रामानंद बोरगांवकर ,सौरभ लोखंडे ,मल्लिकार्जुन जमादार ,अभिषेक नागणसुरे ,आकाश वाघमारे  ,राजकुमार गलुरगी ,सुजल धनगर   प्रथम मिस्कीन ,भाग्योदय कोटे  अथर्व गायकवाड , सिद्धेश्वर लादे,आकाश वाघमारे ,राजकुमार गलुरगी चांगला खेळ करत संघास उपविजेतेपद मिळवून दिले             या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते , प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.        या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिव ज्योती  काडादी , व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी, शैक्षणिक सल्लागार प...

वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच सर्वसमावेशक विकास होतो -- अनिल बनसोडे

इमेज
संगमेश्वरमध्ये विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर दिनांक- २२ शिक्षणाच्या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे विद्यार्थी प्रश्न विचारू लागतो, संशोधन करू लागतो आणि नव्या कल्पना जन्माला येतात. याच विचारांतून वैज्ञानिक, संशोधक, अभियंते आणि समाजसुधारक घडतात. आपल्या समाजासमोर अनेक समस्या आहेत—अंधश्रद्धा, जातिभेद, लिंगभेद, आर्थिक विषमता, पर्यावरणाचा ऱ्हास. या सर्व समस्यांवर मात करण्याची ताकद फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातच आहे.जो समाज वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारतो, तोच समाज समतावादी, प्रगत आणि मानवतावादी बनतो. म्हणूनच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक म्हणजेच सर्व घटकांचा विकास ,वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच होतो.शिक्षण निरीक्षक अनिल बनसोडे यांचे प्रतिपादन. ते संगमेश्वर कॉलेजच्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य  शरणराज काडादी,प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, सोलापूर सायन्स सेंटरचे क्युरेटर राहुल दास,उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे,प्रकल्प समन्वयक विश्वजीत आहेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.  सोलापू...