पोस्ट्स

शेतीच्या आव्हानांना धोरणात्मक उपायांची गरज - अधिष्ठाता डॉ. अनिलकुमार वावरे यांचे मत

इमेज
संगमेश्वरमध्ये स्व.प्रा.डॉ.चंद्रकांत भानुमते स्मृती व्याख्यान संचार प्रतिनिधी सोलापूर, दि. ५- शेती क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी धोरणात्मक सुधारणा, संशोधन व नवोन्मेषाची गरज असल्याचे प्रतिपादन सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांनी व्यक्त केले. सोमवारी, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त), संगमेश्वर रात्र महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग तसेच सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती व्याख्यानाचे करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. वावरे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी होते. आपल्या व्याख्यानात वावरे यांनी 'भारतीय शेतीसमोरील बदलती आव्हाने' या विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. भारतीय शेतीतील संरचनात्मक बदल, हवामान बदलाचा परिणाम, वाढता उत्पादन खर्च, शेतकऱ्यांचे उत्पन्न, बाजार व्यवस्थेतील अस्थिरता, कृषी घोरणे, तंत्रज्ञानाचा वापर व शाश्वत शेती यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर विवेचन...

संगमेश्वर कॉलेजच्या बी.कॉम. 1978 सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

इमेज
  सोलापूर दिनांक -२७ डिसेंबर २०२५  बी.कॉम. 1978 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा संगमेश्वर कॉलेजच्या आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी केशरी अबोली रंगाच्या टी-शर्ट मधील सर्व मान्यवर मंडळी कॉलेजमध्ये आली. त्यांनी कॉलेजचा परिसर बारकाईने पाहून घेतला. प्रत्येकाच्या आठवणींना इथे उजाळा मिळला. त्यानंतर ग्रंथालय, मैदान, क्रीडा विभाग, जिमखाना, नव्याने सुरू झालेले youtube चॅनेलचे हॉल अर्थात कॉलेज मीडिया सेंटर, नवीन इमारती, संगणक कक्ष या सर्व बाबी बारकाईने पाहिल्या. त्यानंतर आरजे श्रद्धा हिने या ज्येष्ठांच्या अनुभवावर मुलाखती घेतल्या. संगमेश्वर हे क्रीडा परंपरेतील अव्वल असलेलले  एकमेव कॉलेज, शिवाजी विद्यापीठापासून असल्याचं आवर्जून क्रीडापटू सांगत होते. त्यांच्यासोबत इथल्या गॅदरिंग मधले काही मजेदार किस्सेही यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. सोबतच के. भोगीशयना यांचा दरारा, गुणवत्तेच्या बाबतीत असलेलं त्यांचं धोरण.एक माणूस म्हणून लोण्याहूनही मऊ असलेला मायेचा माणूस कसा होता? अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला.  या विद्यार्थ्यांसोबत एक वर्ष काही वर्षे ज्युनिअर असले...