संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे हिंदी पखवाड़ा निमित्त झालेल्या पुरस्कारवितरण समारंभ



सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय यांच्याशी केलेल्या करारानुसार (MOU), संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे आयोजित हिंदी पखवाड़ा निमित्त  झालेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कारवितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवराव मुंडे उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षपद उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी भूषविले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला, हिंदी विभागप्रमुख डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी प्रस्तावना मांडून मुख्य पाहुण्यांचे स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी मुख्य पाहुणे डॉ. देवराव मुंडे यांचा यथोचित सन्मान केला. या समारंभाला डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. महानंदा बागले, डॉ. दादासाहेब खांडेकर हे सुद्धा उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. देवराव मुंडे यांनी सांगितले की, हिंदी आता संपूर्ण जगाची भाषा बनली आहे. हिंदी केवळ बोलचालीतच नव्हे तर व्यवहाराचीही भाषा बनली आहे. हिंदीमध्ये रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. १४ सप्टेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटनेत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदीला राजभाषा / राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आणि त्या दिवसापासून हिंदी दिवस उत्साहाने साजरा केला जात आहे. संपूर्ण जगाला हिंदी आपले योगदान देण्याचे काम करत आहे. हिंदीमुळेच संपूर्ण जग एकमेकांशी जोडले जात आहे. आधुनिक भाषा, तंत्रज्ञानाची भाषा, इंटरनेटची भाषा हिंदी बनली आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात हिंदीला अधिक सुसज्ज आणि गतिमान बनवण्याचे काम आपल्याला करावे लागेल. हिंदी भाषा प्रत्येक भाषेशी जोडणी करण्याचे काम करते. प्रत्येक भाषेचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व असल्याने आपण हिंदीत बोलले पाहिजे, हिंदीत व्यवहार केला पाहिजे आणि हिंदीच्या प्रति कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे. संगमेश्वर महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे आयोजित या समारंभाचे त्यांनी कौतुक केले आणि करारानुसार (MOU) येणाऱ्या दिवसांमध्ये विविध चर्चासत्रे, विद्यार्थ्यांचे परिसंवाद, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्याचा संकल्पही यावेळी त्यांनी व्यक्त केला.


अध्यक्षीय भाषणात डॉ. सुहास पुजारी यांनी सांगितले की, आज मराठी आणि हिंदी विभाग एकमेकांच्या सहकार्याने अनेक वर्षे हिंदी दिवस साजरा करत आहेत. हिंदी विभागातर्फे आयोजित या स्पर्धेत मराठी विभागाच्या विद्यार्थिनींनी सर्वाधिक पुरस्कार मिळवून हे सिद्ध केले आहे की हिंदी आणि मराठी एकत्र चालू शकते, त्यांचा एकमेकांशी व्यवहार होऊ शकतो. आज भाषिक क्षेत्रात, आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हिंदी भाषेने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम केले पाहिजे. हिंदी विभागातर्फे केल्या जाणाऱ्या अशा आयोजनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, नवचैतन्य आणि नवजागृती निर्माण होते. येणाऱ्या दिवसांत हिंदी विभाग आणि मराठी विभाग एकत्र येऊन करारानुसार (MOU) अशा प्रकारचे कार्य नक्कीच करतील.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबा शेख यांनी तर आभार प्रदर्शन दीपाली माने यांनी केले. हा समारंभ यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि इतर कर्मचाऱ्यांनीही मोलाची कामगिरी बजावली. विविध स्पर्धांमध्ये पुढील विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले:


हिंदी टिप्पणीलेखन

प्रथम:ज्योती सर्वगोड

द्वितीय:आलिया पाटील

तृतीय:दिपाली शेळके


निबंध लेखन

प्रथम:संध्या निंबाळ

द्वितीय:मेहवेश खान

तृतीय:फातिमा शेख


वक्तृत्व

प्रथम:गायत्री मेट्रे

द्वितीय:प्रतिभा वलेकर

तृतीय:गुरुनाथ टेंगळे


हिंदी पोस्टर

प्रथम:मिनाक्षी बनसोडे

द्वितीय:शिवलीला बनसोडे

तृतीय:अमृता शर्मा


कवितावाचन

प्रथम:गायत्री मेट्रे

द्वितीय:निरंजन ढोबळे

तृतीय:ज्योती सर्वगोड



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी