सुरक्षितता हीच खरी जबाबदारी - वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारी
प्रबोधन कट्ट्याच्या माध्यमातून तीव्र उन्हाळ्याविषयी जनजागृती सोलापूर ( दिनांक ८ ) सध्या तीव्र उन्हाळा जाणवतो, त्या निमित्ताने संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने प्रबोधन कट्ट्याचा उपक्रम प्रतिवर्षी केला जातो. या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक संदेश दिले जातात आणि लोकांमध्ये जनप्रबोधन घडवून आणले जाते. कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असतो. एप्रिल महिना आला की तीव्र उन्हाळ्याची झळ सर्वच लोकांना लागत असते. यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जनतेशी संवाद साधत फलकाच्या द्वारे, घोषणांच्या द्वारे तब्येतीची काळजी घेण्यासाठी प्रबोधन केले, यावेळी हर्षवर्धन पाटील, प्रदीप आर्य, संतोष पवार, मल्लिकार्जुन पाटील, डॉ. गणेश मुडेगावकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी शहर वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारी याने उपस्थित या विद्यार्थ्यांमध्ये सहभाग नोंदवून आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक डॉ.मल्लिनाथ साखरे यांनी मार्गदर्शन केले. रवींद्रनाथ भंडारी म्हणाले ...