कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११५ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धा

    

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दैनिक संचार प्रबोधन मंच, संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११५ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस २५०१ , द्वितीय क्रमांक १५०१  तृतीय क्रमांक १००१, चौथा क्रमांक ७५१ पाचवा,क्रमांक ५५१, सहा क्रमांक ५०१ रुपये तर  उत्तेजनार्थ दोन प्रशस्तिपत्रके अशी बक्षिसे आहेत. 

ही स्पर्धा महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ  विभागातील सर्व शाखांच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी खुली असून  प्रत्येक महाविद्यालयास वरिष्ठ महाविद्यालयातील दोन आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दोन असे चार स्पर्धक पाठवता येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकास ऐन वेळेस विषय दिला जाईल.  विचार करण्यासाठी विद्यार्थ्यास पाच मिनिटे वेळ दिला जाईल आणि बोलण्यास पाच मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धकांचे प्रवेश अर्ज  त्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत  पाठवावेत. स्पर्धकाला येण्या जाण्याची सोय,भोजन व्यवस्था स्वखर्चाने करावयाचे आहे. भाषणे मराठीतून होतील. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक यापूर्वी मिळवलेल्या विजेत्यास या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. दोन किंवा त्याहून अधिक स्पर्धकास समान गुण मिळाल्यास पारितोषिक विभागून दिले जाईल असे स्पर्धा संयोजकांनी कळवले आहे.  

        प्रवेशाची नोंदणी मंगळवार १० सप्टेंबर पर्यंत  करता येईल. प्रवेश अर्ज पाठवण्यासाठी  कर्मयोगी अप्पासाहेब काडादी आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा समिती,  द्वारा - प्राचार्य, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर. या पत्त्यावर पाठवावेत किंवा अधिक माहितसाठी स्पर्धा समन्वयक शिवराज पाटील ( ९४२३३ २६१०३ ), संतोष पवार (८२७५४५८१६०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांनी केले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी, सकाळी ९ वाजता, संगमेश्वर कॉलेजच्या बी- वन, सभागृहात होईल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे