भगवद्गीतेतील विचार विद्यार्थ्यांना ध्येयप्राप्तीसाठी प्रेरणादायी -उपप्राचार्य प्रसाद कुंटे
संगमेश्वर कॉलेज सोलापूर( कनिष्ठ विभाग )भाषा संकुल- संस्कृत विभाग आयोजित गीता जयंती निमित्त कार्यक्रमांमध्ये बोलताना भगवद्गीतेतील अर्जुनाचे प्रश्न आणि श्रीकृष्णाने केलेले त्याचे समाधान हे विद्यार्थ्यांसाठी आजच्या काळात ही प्रेरणादायी आहे. अर्जुनाने मिळवलेले यश त्यासाठी स्वीकारलेला मार्ग हा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे गीता जयंतीच्या निमित्त बोलताना उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ पूजने झाली. त्यानंतर विद्यार्थिनी भाविका गोयल हिने श्रीमद् भगवद्गीता सार सांगितला. साक्षी मेह्त्रे या विद्यार्थिनींने पंधरावा अध्याय पठन केला त्यानंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणावरील धृतराष्ट्र- संजय ,श्रीकृष्ण- अर्जुन संवाद श्रीकृष्ण- सृष्टी देवडीकर अर्जुन -प्राजक्ता रबकई धृतराष्ट्र- यज्ञेश जोशी संजय -आदिती पाटील या विद्यार्थ्यांनी नाट्यरूपाने सादर केले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे भाषा समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी संस्कृत शिक्षक प्रदीप आर्य संतोष पवार अशोक निबंर्गी एस.बी निबंर्गी हर्षवर्धन पाटील शिवराज देसाई आर. व्ही बिराजदार विठ्ठल अरबाळे तेजश्री तळे शिक्षक व वाणिज्य विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी शालिनी जाडकर व आभार प्रदर्शन भक्ती ओलेकर यांनी केले.







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा