पोस्ट्स

समर्पित भावनेने प्र.प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांनी कार्य केले

इमेज
  संगमेश्वर कॉलेजमध्ये सेवानिवृत्ती निमित्त सत्कार     सोलापूर ( दिनांक ३०  नोव्हेंबर) '' प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी समर्पित भावनेने केलेले कार्य  पुढच्या पिढीला मार्गदर्शक आहे. '' असे गौरव उदगार  संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी यांनी काढले. ते प्र.प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे निमंत्रित शैक्षणिक सल्लागार डॉ.प्रमोद दर्गोपाटील, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.गोटे,सौ.सौ माधवी देसाई आदी उपस्थित होते.    प्रारंभी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्यांनी आजपर्यंत  केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर संस्थेच्या वतीने प्राचार्य  प्र.  डॉ.राजेंद्र देसाई यांचा सपत्नीक सत्कार झाला.  त्यानंतर प्रा .डॉ.एस. एस. पाटील,प्रा.शहानुर शेख,डॉ.शुभांगी गावंडे, चंद्रकांत हिरतोट,डॉ. वंदना पुरोहित,डॉ.प्रमोद दर्गोपाटील ...

संशोधकाच्या प्रात्यक्षिकातील ज्ञान रसायनशाश्त्रात महत्वाचे - निवृत्त शास्त्रज्ञ वेंकटेश गंभीर

इमेज
पदव्युत्तर  रसायनशास्त्र  विभाग आणि (सेंद्रीय रसायशास्त्र ) संशोधन प्रयोग शाळेचे उदघाटन  सोलापूर प्रतिनिधी  "आपण जे शिकलात ते कळलंय, कळलेलं प्रत्यक्ष कार्यात वापर करता येते का? आपल्याकडच्या परीक्षा त्यात पडलेले गुण यावरील संशोधन संस्थांचा विश्वास उडालेला आहे. म्हणून संशोधन संस्था स्वतंत्र परीक्षा घेतात. ही गरज का निर्माण झाली याचा शोध घेतल्यानंतर शिक्षण संस्थांमध्ये तयार होणारे पदवीधारक  या  सर्वांचे मशीन्स झाले आहेत. हे दुर्दैव आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष कृतीत  आणण्यामुळे संशोधकाला प्रोत्साहन मिळेल. आकलन, प्रात्यक्षिकातील ज्ञान यावर रसायनशाश्त्र संशोधनातील ज्ञान तपासले जाते. त्यामुळे प्रात्यक्षिकात अर्थात प्रॅक्टिकल्समधील तरुणांनाच रसायनशास्त्र संशोधनात संधी आहेत. भविष्यातील मिळालेल्या कालावधीचा वेध तुम्ही कसे घेता हे महत्त्वाचे आहे.संशोधकाच्या प्रात्यक्षिकातील ज्ञान रसायनशाश्त्र संशोधनात महत्वाचे आहे हे जाणून घ्या " असे प्रतिपादन  निवृत्त शास्त्रज्ञ वेंकटेश गंभीर (बी. ए.आर.सी. व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च)  यांनी केल...

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असा संदेश देत विद्यार्थ्यांचे प्रबोधन

इमेज
 वाहनांचा वेग अनिवार झाला की अनेक अपघातांना निमंत्रण मिळते या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम सामान्य नागरिकांना कळावे आणि  त्याचे प्रबोधन करावे या हेतूने संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग प्रबोधन कट्टा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सात रस्ता इथल्या गजबजलेल्या ठिकाणी  हातामध्ये फलक घेऊन नागरिकांचे  प्रबोधन केले. जे वाहतुकीचे नियम पाळत आहेत त्यांचं कौतुक करून लोकांचे प्रबोधन करण्यात आले. यात  संगमेश्वर कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.   उपप्रादेशिक परिवहनचे अधिकारी प्रशांत वनवे , तेजस्वीनी वायचळ, संगमेश्वर कॉलेज कला विभागाचे समन्वयक प्रा. शिवशरण दुलंगे, प्रा. हर्षवर्धन पाटील, प्रा. प्रदीप आर्य यांचा सहभाग होता. या उपक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांचे मार्गदर्शन लाभले.कनिष्ठ विभागाच्या समाजशास्त्र आणि संस्कृत विभागाच्या वतीने  हा उपक्रम राबवला गेला . सोलापूर ( दिनांक २३ )

वाचन हीच लेखनाची मूळ प्रेरणा – योगीराज वाघमारे

इमेज
संगमेश्वरमध्ये ' वाचन प्रेरणा '  भित्तीपत्रिकेचे प्रकाशन सोलापूर:      कोणताही लेखक सहजासहजी घडत नाही. त्याला लेखन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. श्रवण, वाचन, भाषण आणि लेखन ही भाषिक कौशल्ये आहेत. चांगले ऐकणे जसे महत्त्वाचे आहे. तसेच चांगले वाचणे सुध्दा महत्वाचे असते. यातूनच लेखन प्रेरणा मिळत असते. कॉलेज जीवनात भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून सुरू झालेले लेखन पुढे लेखक म्हणून घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरते. असे विचार ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे यांनी व्यक्त केले. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्‌मय मंडळाच्या अंतर्गत वाचन प्रेरणा विशेषांक २०२३ या भित्तीपत्रिकेचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. १५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्र्‌पती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म्‌दिवस असून तो वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनानिमित्त् विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा ही भित्तीपत्रिका तयार केली होती. तिच्या प्रकाशन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगीराज वाघमारे उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र्‌ देसाई यांनी अध्य...

वक्तृत्व,रंगभरण व पत्रलेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण

इमेज
 आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल यांचा उपक्रम  सोलापूर ( शहर संचार दिनांक १३)   कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी या स्पर्धा संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये झाल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल आकाशवाणी सोलापूरचे प्रसारण अधिकारी डॉ.सोमशेखर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य प्रियांका समुद्रे उपस्थित होत्या.      प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते कर्मयोगी   अ प्पांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य प्रियंका समुद्र यांनी प्रास्ताविक केलं. पाहुण्यांची ओळख वंदना श्रीमल यांनी करून दिली.  संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार झाला.  विजेते याप्रमाणे ------------रंगभरण स्पर्धा (गट - एलकेजी युकेजी) प्रथम क्रमांक -  युवनाते उन्नती उमेश (दमाणी  विद्यामंदिर )  द्वितीय क्रमांक -  जगताप श्रावणी विवेक  (राज मेमोरियल इंग्लिश स्कूल)  तृतीय क्रमांक -  बालिंगल जान्हवी राघवेंद्र (प्रिसिजन स्कूल )  गट ...

सेवा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योगांची निवड करा - राजशेखर शिंदे

इमेज
संगमेश्वरमध्ये उद्योजकता विकासावर वाणिज्य शाखेत मार्गदर्शन  '' वाणिज्य क्षेत्रातील ज्ञान घेताना आपण सेवा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योगांचा अभ्यास केला, व्यवसायाला सचोटीची जोड दिली, तर सेवा क्षेत्रात उत्तम उद्योग उभारता येईल.  सेवा क्षेत्रातील नवनवीन उद्योग सेवा व्यवसायांची निवड करा'' असे प्रतिपादन राजशेखर शिंदे यांनी केलं. ते 'माझं करियर' अंतर्गत उद्योजकता विकास या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. मंचावर पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, वाणिज्य विभाग प्रमुख बसय्य्या हणमगाव उपस्थित होते.  प्रारंभी पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी  महाविद्यालयीन जीवनातील शिक्षणाबरोबरच उद्योग विश्वातील घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचा असल्याच सांगितलं. त्यानंतर मार्गदर्शकांचा कॉलेजच्या वतीने सत्कार झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिंदे यांनी सोलापुरातील शून्यातून उद्योगविश्वात भरारी मारणाऱ्या अनेक यशस्वी तरुणांची यशोगाथा सांगत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत उद्योग व्यवसायासाठी कसे सहकार्य केले जाते याबद्दल विवेचन केले.  ...

विद्यार्थ्यांनी अंत:प्रेरणेतून लेखन करावे – रजनीश जोशी

इमेज
  संगमेश्वरमध्ये मराठी वाङ्मय  मंडळाचे उद्घाटन सोलापूर दिनांक ६  भाषा ही मानवी जीवनातील महत्त्वाचे संवादसाधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतो. बोलणे आणि लिहिणे ही भाषेची महत्त्वाची कार्ये आहेत. यातील लेखन ही कला असून लिपीच्या माध्यमातून ती साध्य् होत असते. सर्जनशील लेखनासाठी अंत: करणात प्रेरणा निर्माण व्हायला हवी. वाचनातून लेखनाचे संस्कार होता. लिहिण्याची उर्जा मिळते. इतरांच्या साहित्याचे वाचन केल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही. परंतु त्याचे अनुकरण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अंत:प्रेरणेतून लेखन करावे. असे विचार ज्येष्ठ पत्रकार व लेखक रजनीश जोशी यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मधील मराठी वाङ्‌मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख सुहास पुजारी होते. जोशी यांनी विद्यार्थ्यांना भाषा, साहित्य्‌, समाज आणि संस्कृती विषयी मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा अभिजातपणा सांगितला. सोलापूरजवळील कुडल...